ज्यांना आज काही ठरावीक समाजांचा कळवळा येतोय त्यांना ओबीसींशी काही देणंघेणं नाहीए का? त्यांच्याकडे फक्त वोटबँक म्हणूनच बघणार आहात का? राज्य सरकारने ओबीसी आरक्षण २७ टक्क्यांच्यावर गेलं अशी कबुली सुप्रीम कोर्टात दिली. मग ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जे राजकीय आरक्षण काढून घेण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? याचं उत्तर कोण देणार? तुम्ही एका ठराविक जाती किंवा समाजासाठी सरकार चालवताहेत का? ओबीसींशी तुमचं काहीच देणंघेणं नाहीए का? हा कळवळा आणि ही तळमळ ओबीसींवर होत असलेल्या अन्यायावेळी का दिसून येत नाही? असा प्रश्न प्रीतम मुंडेंनी यांनी केला. केंद्र सरकारची भूमिका ही सर्व समाजांना आणि जातींना एकत्रित पुढे घेऊन जाण्याची आहे आणि न्याय देण्याची आहे. यासाठी १० टक्के सवर्णांच्या आरक्षणांचा मुद्दा आपण उपस्थित केला, असं त्यांनी सांगितलं.
चंद्रपूरच्या काँग्रेस खासदारांमुळे लोकसभेत हशा पिकला; आधी नाही, मग हो म्हणाले
आमचं अस्तित्वात असलेलं ओबीसींचं राजकीय आरक्षण घालण्याचं पाप महाराष्ट्रातील सरकारने केलेलं आहे. ही आजची ओबीसींची स्थिती आहे. ओबीसी समाज तुम्हाला कधीच क्षमा करणार नाही. कारण राज्य सरकार आपली भूमिका मांडण्यात अपयशी ठरलं आहे. फक्त ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा नाहीए तर एमपीएससी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या नियुक्त्या होत नाही. कारण आरक्षणावर निर्णय होत नाहीए. या विद्यार्थ्यांना न्याय कधी मिळेल? एमपीएसची आयोगावर ठराविक एका जातीचेच लोक नियुक्त केले जातात. इतर जातींकडे का दुर्लक्ष केलं जातं? या प्रश्नांची तुम्ही उकल केली तर तुम्ही खरंच वंचितांचे विषय उचलताय हे सिद्ध होईल, असं प्रीतम मुंडे म्हणाल्या.
‘आरक्षणासाठी समाजा-समाजाने रस्त्यावर उतरून एकमेकांची डोकी फोडायची का?’
प्रत्येक गोष्ट केंद्र सरकारवर ढकलायची हे काम विरोधकांकडून सुरू आहे. ५० टक्क्यांमध्ये आरक्षण बसवायचं तर कोणत्या जातीला किती आरक्षण द्यायचं? असा सवाल काहींनी केंद्र सरकारला केला. केंद्र सरकारने हे जर सांगितल तर आगामी काळात मराठा आरक्षणाचा प्रश्न मिटला म्हणून १०० टक्के श्रेय हे केंद्र सरकारचं आहे, हे मान्य करायला तुम्ही तयार व्हाल का? असं असेल केंद्र सरकार वर्गीकरण करून देईल. चांगले निर्णय आमचे आणि सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला तर ते केंद्राचे अपयश. अशी भूमिका असेल तर योग्य वेळ आल्यावर जनता तुम्हाला तुमची जागा दाखवेल, असं खासदार डॉ. प्रीतम मुंडे म्हणाल्या.
supriya sule : ‘आरक्षणावर महाराष्ट्रातून दिशाभूल केली जातेय’, सुप्रिया सुळेंचा फडणवीसांवर निशाणा
भाजपसोबत सोन्याच्या ताटात जेवलात तेव्हा सगळं गोड लागलंः नवनीत कौर राणा ( navneet kaur rana )
महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षांपासून एकच कार्यक्रम सुरू आहे. चांगलं केलं तर ते आम्ही. वाईट झालं तर ते केंद्र सरकारने केलं, असं चाललं आहे. पण केंद्र सरकारने ओबीसींना न्याय देण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून केला जात आहे. महाराष्ट्रातील मराठा आणि धनगर समाजालाही यातून न्याय मिळेल. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ओबीसी समाजाला न्याय देण्यासाठी दोन दिवसांचं विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलवावं. गेल्या ६० ते ७० वर्षांत ओबीसींना न्याय का दिला गेला नाही. सरकारने सोन्याचं ताट समोर ठेवलंय. पण त्यात लोणचं आहे ना, जेवण, असं शिवसेनेचे नेते म्हणाले. पण ३२ वर्षे ज्या पक्षाबरोबर तुम्ही सोन्याच्या ताटात जेवले, लोणचंही खाल्लं तेव्हा सर्व तुम्हाला मिळत होतं. आता हे सोन्याचं ताट पाहून शिवसेना पुन्हा भाजपसोबत येईल आणि सत्ता स्थापन करेल, अशी अपेक्षा आहे. शिवसेनाचं खूप मजेदार धोरण आहे. पोटात एक आणि ओठात एक, अशी शिवसेनेची भूमिका कायम राहिली आहे. शिवसेना ओबीसींच्या न्याय देण्याच्या हितात ते नाही आणि नाही शिवसेने समर्थन केलंय. यामुळे शिवसेनेची भूमिका काय हे स्पष्ट होत नाही, असा टोला अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांनी लगावला.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
#shiv #sena #भजपसबत #सततत #असतन #सनयचय #तटत #जवतन #गड #लगल #परतम #मड #नवनत #रणच #लकसभत #हललबल