खरीप असो किंवा रब्बी हंगाम, सरकारने MSP वर शेतकऱ्यांकडून आतापर्यंतची सर्वात मोठी खरेदी केली आहे. यासह, सुमारे १ लाख ७० हजार कोटी रुपये धान उत्पादकांच्या खात्यात आणि सुमारे ८५ हजार कोटी रुपये थेट गहू उत्पादकांच्या खात्यात जमा केले आहेत. करोना महामारीमुळे गेल्या दीड वर्षात जगभरातील बदल आपण अनुभवले. या काळात देशातच खाण्याच्या सवयींबाबत जागृती झाली आहे. भरड धान्य, मसाले, भाज्या, फळे, सेंद्रीय उत्पादनांची मागणी झपाट्याने वाढत आहे, असं ते त्यांनी सांगितलं.
देशाच्या स्वातंत्र्याची १०० वर्षे पूर्ण होतील, त्यावेळी २०४७ मध्ये भारताची काय स्थिती असेल? आपली शेती, हे ठरवण्यात आपल्या शेतकऱ्यांची मोठी भूमिका आहे. नवीन आव्हानांचा सामना करू शकेल आणि नवीन संधींचा लाभ घेता येईल, अशी भारताच्या शेतीला दिशा देण्याची हीच वेळ आहे, असं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलं.
pradhan mantri kisan samman nidhi : पीएम किसान योजना; शेतकऱ्यांच्या खात्यात आज २००० रुप
देश आपला ७५ वा स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहे. हा महत्त्वाचा टप्पा केवळ आपल्यासाठी अभिमानाची बाब नाही, तर नवीन संकल्प, नवीन ध्येयांची संधी आहे. आपल्याला येत्या २५ वर्षांत भारताला कुठे पाहायचा आहे हे ठरवण्याची ही संधी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मी सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी चर्चा करत आहे. सरकारने केलेल्या योजनांचा लाभ जनतेपर्यंत कसा पोहोचतोय हे आम्हाला चांगल्या प्रकारे समजत आहे. जनता जनार्दनशी थेट संपर्क साधण्याचा हा फायदा आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. यावेळी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनही योजनांची माहिती दिली. करोना महामारीत अनेक अडचणींवर मात करत शेतकऱ्यांनी मोठे कष्ट केले आहेत. गेल्या वर्षी बंपर उत्पादन घेतले, असं तोमर म्हणाले.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
#kisan #yojana #शतकऱयचय #खतयत #जम #झल #१९५०० #कट #मद #महणल #जनत #जनरदनश #थट #कनकशन