एजबॅस्टन, 3 जुलै : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्ट मॅचवर टीम इंडियाची (India vs England 5th Test) पकड आणखी मजबूत झाली आहे. मॅचच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा 284 रनवर ऑल आऊट झाला, त्यामुळे भारताला पहिल्या इनिंगमध्ये 132 रनची आघाडी मिळाली. भारताकडून मोहम्मद सिराजने (Mohammad Siraj) सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. तर जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) 3 आणि मोहम्मद शमीला 2 विकेट मिळाल्या. शार्दुल ठाकूरला 1 विकेट घेण्यात यश आलं.
इंग्लंडकडून जॉनी बेयरस्टोने (Jonny Bairstow) शतक केलं. त्याने 140 बॉलमध्ये 106 रनची खेळी केली, ज्यात 14 फोर आणि 2 सिक्सचा समावेश होता. याशिवाय सॅम बिलिंग्सने 36, जो रूटने 31 आणि कर्णधार बेन स्टोक्सने (Ben Stokes) 25 रन केले.
या सामन्यात इंग्लंडने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांच्या शतकाच्या मदतीने भारताने 416 रनपर्यंत मजल मारली. इंग्लंडकडून जेम्स अंडरसनला 5 आणि मॅटी पॉट्सला 2 विकेट मिळाल्या, याशिवाय ब्रॉड, स्टोक्स आणि रूट यांना 1-1 विकेट घेण्यात यश आलं.
भारत आणि इंग्लंड यांच्यात मागच्या वर्षी 4 टेस्ट मॅच झाल्या होत्या, पण कोरोना व्हायरसमुळे पाचवी टेस्ट खेळवली गेली नाही. ही टेस्ट मॅच आता एजबॅस्टनमध्ये खेळवली जात आहे. या सीरिजमध्ये टीम इंडिया 2-1 ने आघाडीवर आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: India vs england
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]
#पचवय #टसटवर #टम #इडयच #पकड #बलरसचय #धमकयमळ #रनच #आघड