गिलगिट-बाल्टिस्तानचा मुद्दा हा अतिशय संवेदनशील असल्याने पाकिस्तानची घटना, आंतरराष्ट्रीय कायदे, काश्मीरमधील सार्वमतासंबंधी संयुक्त राष्ट्रांनी केलेले ठराव आदींचा बारकाईने अभ्यास करण्यात आला अशी माहिती सूत्रांनी दिली.
वाचा: होय, भारतासोबत गुप्त बैठक झाली; पाकिस्तानचा मोठा खुलासा
परिणाम काय?
गिलगिट-बाल्टिस्तानला तात्पुरता प्रांतीय दर्जा मिळाल्यास सध्या अस्तित्वात असलेला तेथील निवडणूक आयोग हा पाकिस्तान निवडणूक आयोगात विलीन होण्याची शक्यता आहे. तसेच, तेथील सर्वोच्च अपीलीय न्यायालयदेखील बंद करण्यात येईल. याशिवाय पाकिस्तानने हे पाऊल उचलल्यास भारताकडून तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.
भारताचा सज्जड इशारा
गिलगिट-बाल्टिस्तानसह जम्मू-काश्मीर-लडाखचा पूर्ण केंद्रशासित प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग असून पाकिस्तान सरकार अथवा त्यांच्या न्यायपालिकेस या भागाचा अवैधपणे वा बळजबरीने कब्जा करण्याचा अधिकार नाही, असा सज्जड इशारा भारताने पाकिस्तानला दिला आहे.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
#पकसतनच #आगळक #गलगटबलटसतनल #परतय #दरज #दणयचय #हलचल