काय आहे सुमीतचं ट्विट?
एक साधा प्रश्न. माझ्या सारख्या सामान्य मुंबईकराला जेव्हा कळत होतं की जे झालं ते योग्य नव्हतं (म. वि. आ) तर मग एकनाथ साहेब,तुमच्या सारख्या कट्टर शिवसैनिकाला,जो बाळासाहेबांच्या आणि खासकरून दिघे साहेबांच्या तालमीत तयार झाला आहे,अडीच वर्ष का लागावी हा निर्णय घ्यायला? असा थेट प्रश्न सुमीतनं त्याच्या ट्विटमध्ये एकनाथ शिंदे यांना विचारला आहे.

आरोह वेलणकरचं ट्विटही चर्चेत
एकनाथ शिंदे मंगळवारी बराच काळासाठी नॉट रिचेबल होते. त्यानंतर त्यांनी एक ट्वीट करून त्यांची भूमिका पुसटशी मांडली होती. त्यांनी असं ट्वीट केलं होतं की, ‘आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत… बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही’. त्यामुळे नेमकी त्यांनी काय भूमिका घेतली आहे हे स्पष्ट झाले नव्हते. आरोहनं एकनाथ शिंदेंच ट्विट री-ट्विट करत लिहिलं होतं की, ‘परत जाऊ नका आता म्हणजे मिळवलं’. आरोहच्या या ट्वीटवर सोशल मीडियावर विविध कमेंट्स येत आहेत. काहींनी आरोहवरच टीका केली असून काही नेटकऱ्यांनी त्याला पाठिंबा दिला आहे.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]
#नरणय #घययल #अडच #वरष #क #लगव #समत #रघवनच #एकनथ #शदन #सवल