भारताला धक्का का?
भारताने इराणच्या चाबहार बंदराच्या मार्गे झारंज शहरातून मध्य आशियातील इंधन आणि गॅस साठा असलेल्या ताजिकिस्तान, उझबेकिस्तान आणि किर्गिस्तान या देशांसोबत जोडण्याचा प्रयत्न केला होता. झारंज शहर हे भारतासाठी प्रवेशद्वार होते. भारताने इराणहून अफगाणिस्तानच्या झारंज शहरापर्यंत कोट्यवधी खर्च करून रस्ता तयार केला होता. या नव्या सिल्क रुटच्या माध्यमातून भारत झारंजला हब बनवणार होता. आता या शहरावर तालिबानचा ताबा आहे.
वाचा:अमेरिका अफगाणिस्तानला वाऱ्यावर सोडणार? बायडन म्हणाले की…
अफगाणिस्तानमधील ग्रामीण भागावर ताबा मिळवल्यानंतर तालिबानने व्यापाराच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या सीमावर्ती भागातील चौकी ताब्यात घेतल्या. इराण, पाकिस्तान आणि ताजिकिस्तानच्या मार्गे होणाऱ्या व्यापारावर तालिबानचे नियंत्रण आले आहे. त्यामुळे अफगाणिस्तान सरकारची कोंडी झाली आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते या महिन्याअखेरीस अथवा पुढील महिन्यात तालिबान काबूल ताब्यात घेण्यासाठी निर्णायक लढाई छेडतील.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
#तलबनकडन #भरतच #सवपन #उदधवसत #कबलचय #दशन #कच