<p style="text-align: justify;"><strong>नवी दिल्ली :</strong> अफगाणिस्तानमधील बिघडत चाललेली परिस्थिती पाहता भारताने कंधार नंतर मजार-ए-शरीफमधील आपले वाणिज्य दूतावास बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. भारत सरकारने आपले मुत्सद्दी, अधिकारी आणि इतर भारतीयांना परत आणण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय अधिकारी बुधवारी सकाळपर्यंत भारतात पोहोचतील.</p>
<p style="text-align: justify;">यासाठी एक विशेष विमान काबूलला पोहोचले असल्याची माहिती सरकारच्या उच्च सूत्रांनी दिली आहे. हे विमान मजार-ए-शरीफला उतरेल आणि भारतीय अधिकाऱ्यांसोबत आज संध्याकाळपर्यंत उड्डाण करू शकते. भारत सरकारने हा निर्णय अशा वेळी घेतला आहे, जेव्हा अफगाणिस्तानमधील मजार-ए-शरीफमधील सुरक्षा व्यवस्था बिघडत चालली आहे.</p>
<p style="text-align: justify;">काही दिवसांपूर्वी अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याशी चर्चा केली. या दोघांमध्ये संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत अफगाणिस्तान-तालिबानवर विशेष चर्चा करण्याची मागणी होती. त्यानंतर या महत्त्वाच्या विषयावर तिथे चर्चा झाली.</p>
<p style="text-align: justify;">या चर्चेदरम्यान भारताने स्पष्टपणे सांगितले होते की शांतता प्रस्थापित करण्यासाठी तालिबानने दहशतवादाचा मार्ग सोडून द्यावा आणि त्याचवेळी अल कायदा आणि इतर दहशतवादी संघटनांशी संबंध तोडावेत. भारताकडून सुरक्षा परिषदेत या चर्चेबद्दल असेही म्हटले गेले की तालिबान चर्चेच्या प्रक्रियेत दबाव वाढवण्यासाठी हिंसेचा मार्ग वापरू शकत नाही.</p>
<p style="text-align: justify;">सध्या अफगाणिस्तानमध्ये लष्कर आणि तालिबान यांच्यात संघर्ष सुरू आहे. तालिबान शक्य तितक्या लवकर काबूल शहर पूर्णपणे काबीज करण्याचा प्रयत्न करत आहे, तर लष्कर या दहशतवाद्यांना शहराबाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे.</p>
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
#तणवगरसत #परसथतमळ #अफगणसतनमधल #मजरएशरफमधल #रजदतन #परत #आणणयच #भरतच #नरणय