कपिल देव म्हणाले, “मी विराट कोहलीइतके क्रिकेट खेळलो नाही. कधी कधी तुम्ही फारसे क्रिकेट खेळले नसावे पण, तुम्ही गोष्टी शोधून काढू शकता. आम्ही क्रिकेटही खेळलो आणि खेळ समजून घेतला. त्यांचे विचार सुधारावे लागतील. तुम्ही आम्हाला तुमच्या खेळत चुकीचे सिद्ध केल्यास, आम्ही ते स्वीकारू. जर तुम्ही धावा केल्या नाहीत तर कुठेतरी काहीतरी चुकतंय असं आम्हाला वाटेल. आम्हाला फक्त एकच गोष्ट दिसते आणि ती म्हणजे तुमची कामगिरी आणि ती चांगली नसेल तर लोकांनी गप्प बसावे अशी अपेक्षा करू नका. तुमची बॅट आणि तुमची कामगिरी बोलली पाहिजे, आणखी काही नाही.”
वाचा – असे काय झाले की, टीम इंडियाचे ४ जण भारताविरुद्ध खेळणार; जाणून घ्या
कोहलीचा खराब फॉर्म चिंताजनक
भारताचा माजी कर्णधार पुढे म्हणाले की, कोहलीसारख्या मोठ्या खेळाडूने इतके दिवस शतक झळकावले नाही याचा विचार करणे दुखावते. कोहलीने शेवटचे शतक नोव्हेंबर २०१९ मध्ये केले होते म्हणजेच त्याने शतक झळकावून दोन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. कोहलीचा फॉर्म केवळ त्याच्यासाठीच नाही तर टीम इंडियासाठीही चिंतेचा विषय असल्याचे कपिल यांना वाटते.
वाचा – खेळाडूच्या पत्नीने सांगितले सेक्स लाइफचे रहस्य, पाहा नेमकं काय म्हणाली…
‘कोहलीच्या खराब फॉर्ममुळे सर्वजण त्रस्त’
भारताचे माजी विश्वविजेते कर्णधार पुढे म्हणाले की, “एवढा मोठा खेळाडू (कोहली) शतकाची वाट पाहत असल्याचे पाहून मला वाईट वाटते. तो आमच्यासाठी हिरोसारखा आहे. राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, सुनील गावसकर किंवा वीरेंद्र सेहवाग यांच्याशी तुलना करता येईल असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल असे आम्हाला कधीच वाटले नव्हते. पण नंतर तो आला, आणि त्याने आम्हाला तुलना करायला भाग पाडले आणि आता गेल्या दोन वर्षांपासून तो धावा काढण्यासाठी झगडत आहे, त्यामुळे आम्हा सर्वांना त्रास झाला आहे.”
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]
#खळत #यत #नसल #तर #वरटचय #फरमवर #दगगज #करणधरच #ठम #मत