उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर धामी यांनीही लोकांना एक महत्त्वाचं आवाहन केलं आहे. ज्यांना आरोग्यासंबंधी काही तक्रारी असतील त्यांनी काही दिवसांनी केदारनाथची यात्रा करावी, असं आवाहन केलं आहे.
वाचाः पाक खासदाराचा न्यूड व्हिडिओ लीक; तिसऱ्या पत्नीवर केले गंभीर आरोप
६ दिवसांत लाखो भाविकांनी केलं दर्शन
करोनामुळं गेल्या दोन वर्षांपासून केदारनाथ यात्रा बंद करण्यात आली होती. जवळपास दोन वर्षांनंतर भाविकांसाठी मंदिराचे दरवाजे खुले करण्यात आले आहेत. गेल्या ६ दिवसांत जवळपास १ लाख ३० हजार लोकांनी दर्शन घेतलं. त्यामुळंच प्रशासनाने व्हीआयपी रांगा बंद करण्यात आल्या आहेत.
वाचाः भारताची ताकद आणखी वाढणार; चीन, पाकिस्तानला धडकी भरवणाऱ्या ब्रह्मोसची यशस्वी चाचणी
यापूर्वी प्रशासनाने योग्य नियोजन न केल्यामुळं अनेक लोकांचा मृत्यू झाला होता. रुद्रप्रयागहून ११ रुग्णांना एअरलिफ्ट करुन दुसऱ्या ठिकाणी पाठवण्यात आलं होतं. परिस्थिती इतकी भयंकर होती की पोलिसांनी लाठीचार्जही केला होता. केदारनाथबरोबरच बद्रीनाथ आणि यमुनोत्रीपरिसरातही नियोजनाचा अभाव दिसून आला होता.
वाचाः पंतप्रधान मोदी श्रीनगरला का जात नाहीत?; काश्मीरी पंडिताच्या हत्येवर भाजप नेत्याचा सवाल
जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, केदारनाथच्या यात्रेसाठी आलेल्या भाविकांना आता एकाच रांगेतून उभं राहून दर्शन करता येणार आहे. तसंच, रांगेत उभ्या असलेल्या भाविकांना फक्त दोन तासांचा अवधी मिळणार आहे.
वाचाः कॉंग्रेसमध्ये एका कुटुंबात एकच तिकीट देण्याचा विचार, अर्थात अपवाद असणार!
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
#कदरनथमधय #वहआयप #एटर #बद #आत #सरवसमनयपरमण #घयव #लगणर #दरशन