भारताकडे चांगले वेगवान गोलंदाज असून त्यांच्यापैकी कोणाला संधी मिळते, याची उत्सुकता चाहत्यांना असेल. मोहम्मद शमीकडे चांगला अनुभव असून तो चांगल्या फॉर्मातही आहे. त्यामुळे त्याचे या सामन्यातील स्थान निश्चित समजले जात आहे. त्याचबरोबर इशांत शर्मा आणि जसप्रीत बुमरा हे दोन वेगवान गोलंदाज संघात आहेत, ज्यांना फायनलमध्येही संधी दिली होती आणि ते अपयशी ठरले होते. पण हा पहिलाच कसोटी सामना असल्यामुळे या दोघांनाच जास्त पसंती मिळेल. पण दोघांपैकी एकाला वगळण्याचा निर्णय घेण्यात आला तर मोहम्मद सिराज हा सर्वोत्तम दावेदार असेल. कारण सराव सामन्यातही सिराजने चांगली गोलंदाजी केली होती. त्यामुळे या तीनपैकी कोणत्या दोन गोलंदाजांना संधी मिळते, हे पाहणे महत्वाचे असेल. पण पहिल्या सामन्यात तरी इशांत आणि बुमरा यांनाच पसंती मिळेल, असे दिसत आहे. भारतीय संघात यावेळी दोन फिरकीपटूही असतील आणि त्यासाठी आर. अश्विन व रवींद्र जडेजा यांची नावं जवळपास निश्चित समजली जात आहेत. कारण गोलंदाजीबरोबर ते उपयुक्त फलंदाजीही करू शकतात आणि हे संघाच्या नक्कीच फायद्याचे ठरणार आहे. त्यामुळे पहिल्या कसोटी सामन्यासाठी फायनलचा संघच जवळपास कायम राहील, असेच दिसत आहे.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]
#इगलडवरदधचय #पहलय #कसटत #भरतचय #कणतय #११ #खळडन #मळणर #सध #जणन #घय #सघ