मजार-ए-शरीफमधील भारतीय दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळी मजार-ए-शरीफमधून एक विशेष विमान नवी दिल्लीसाठी रवाना करण्यात येणार आहे. त्यामुळे या भागात असणाऱ्या भारतीयांनी तातडीने संध्याकाळच्या विमानाने नवी दिल्लीसाठी रवाना होण्याचे आवाहन दूतावासाने केले आहे.
या विमानाने मायदेशी जाणाऱ्या भारतीयांनी आपले नाव, पासपोर्ट क्रमांक आणि अन्य माहिती व्हॉट्स अॅपवर देण्याची सूचना करण्यात आली आहे. ही माहिती ०७८५८९१३०३, ०७८५८९१३०१ या क्रमांकावर पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तालिबानने अफगाणिस्तानवर निर्णायक पकड घेतल्यास भारतीयांच्या जीवाला धोका संभावण्याची शक्यता आहे. त्यामुळेचे भारताकडून सतर्कता बााळगली जात आहे.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
#अफगणसतनमधल #य #भगतल #भरतयन #मयदश #परतणयच #आदश